विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी

पियाळी-बौद्धवाडी येथील घटना
विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी

कणकवली (सिंधुदुर्ग) : तुटलेल्‍या विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाल्‍याने दोन गायी जागीच मृत झाल्या तर बैलाला सोडविण्याच्या प्रयत्‍नात शेतकरी किरकोळ जखमी झाला. तसेच बैलाला वाचविण्यातही यश आले. तालुक्‍यातील पियाळी गावातील बौद्धवाडी येथे सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

तालुक्‍यातील पियाळी (बौद्धवाडी) येथील शेतकरी विश्वनाथ विश्राम कदम हे सकाळी सातच्या सुमारास आपली गुरे चरावयास घेऊन तेथील माळरानावर जात होते. यात तुटलेल्‍या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्‍याने त्‍यांच्या दोन गायी जागीच मृत झाल्या. या तारामध्ये बैल देखील अडकला होता. ही बाब लक्षात येताच काठीच्या साहाय्याने विद्युत तार बाजूला करून विश्‍वनाथ कदम यांनी बैलाला वाचवले. त्‍याचवेळी त्‍यांनाही विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्‍याने ते दूर फेकले गेले. सुदैवाने त्‍यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. या घटनेची माहिती स्थानिकांना दिल्‍यानंतर महावितरणशी संपर्क साधून पियाळी भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर दुपारनंतर तुटलेल्या वीज तारा बाजूला करण्यात आल्या.

विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी
दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर

दरम्‍यान, दोन गायी दगावल्‍याने विश्‍वनाथ कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्‍यामुळे महावितरणने कदम यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती संतोष कानडे यांनी आज केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com