
चिपळूण : तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेर्डी (जि. रत्नागिरी) येथील माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांसह आठ जणांवर 20 लाख रूपयांच्या फसवणुकीप्रकरणी सोमवारी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणी योजनेतील रस्त्यासाठी भराव व उत्खनन करून नुकसान केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री जयंद्रथ खताते, त्यांचे पती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, तत्कालीन ग्रामसेवक कांबळे, ठेकेदार धोंडीराम रेडेकर (कोल्हापूर) व त्याचा एक सहकारी, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकारी अपूर्वा पाटील, शाखा अभियंता रवी जाधव व संबंधित अधिकारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची फिर्याद आप्पाजी बाळा दाभोळकर ( वय 53, खेर्डी-विठ्ठलवाडी) यांनी दिली आहे. तत्कालीन सरपंच जयश्री खताते, जयंद्रथ खताते व अन्य आठ जणांनी एकमेकांच्या संगनमताने 12 मार्च ते 2 एप्रील 2019 या कालावधीत आपल्या खासगी मालकीच्या जागेतील सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या मातीचे उत्खनन केले. तीन किलोमीटर लांबीचा व 18 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी हे उत्खनन करण्यात आले. त्यातील दगड व जंगली झाडेही परवानगीविना तोडण्यात आली. तसेच सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या जमिनीचे नुकसानही केले आहे. खोटे ठराव करून ही फसवणूक केली असल्याचे दाभोळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम कलम 48 (6) व भारतीय वन अधियम 1927 च्या कलम 41 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण तपास करीत आहेत.
फिर्यादीतील मुद्दे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.