

rural economy fuel crisis
sakal
सावंतवाडी : शासकीय स्तरावर पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात सर्वत्र तीव्र इंधन टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, आंबा-काजू बागायतदार, शेतकरी आणि मच्छीमार यांना व्यवसायासाठी मुबलक इंधन तातडीने उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची आज भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.