राजापूर/संगमेश्वर : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील असह्य उकाड्याने त्रस्त असताना गुरुवारी (ता. २६) दुपारनंतर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यांत अचानक विजांच्या कडकडाट, गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. .ओणी-वाटूळ परिसरात वीस मिनिटे पडलेल्या गारपिटीने घरांची छपरे आणि अंगणे पांढरीशुभ्र झाली होती. एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रथमच गारांचा पाऊस झाला. या संकटामुळे हातातोंडाशी आलेला आंबा-काजूचा घास हिरावला जाण्याची भीती आहे..Dharashiv News: काढणीला आलेला घास पाण्यात! धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल.गेले पंधरा दिवस जिल्ह्यात पारा ३८ अंशांपर्यंत गेला होता. हवामान खात्याने वादळी पावसाचे संकेत दिले होते, मात्र सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी अचानक वातावरणात सुरुवातीला गारवा आला. राजापूर तालुक्यातील ओणी, वाटूळ आणि परिसरात दुपारी अचानक ढग जमा झाले आणि पाहता पाहता गारांचा पाऊस सुरू झाला. गेल्या १५ ते २० वर्षांत तालुक्यात अशा गारा पडल्या नव्हत्या. लिंबाच्या आकाराच्या गारा पडत असताना अनेकांनी त्या हातात पकडल्या..संगमेश्वर तालुक्यातील देवळे, चाफवली, मेघी या पंचक्रोशीमध्ये ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात दुपारी ३ वाजल्यापासून आकाशात पावसाच्या ढगांनी दाटी केली. त्यानंतर जोराचा वारा सुरू झाला. पाठोपाठ संगमेश्वर-शिवने गावात प्रथम गारांचा पाऊस झाला आणि नंतर काही वेळ पावसाच्या दमदार सरी पडत होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात भाजावणीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली. .Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान.रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे उत्सव सुरू असणाऱ्या मंदिरातून भाविकांची धावपळ झाली. सोनवडे आणि पांगरी परिसरात वीज कोसळली, सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. सोनवडे येथील गजानन सनगरे यांच्या घरावर वीज कोसळली. या घरातील सदस्य सुरक्षित असून, विजेच्या झटक्याने वीज मीटर जळून खाक झाला आहे. .घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही नुकसान झाले आहे. तसेच दुसरी घटना पांगरी येथे घडली. येथील सचिन घडशी यांच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्यामुळे झाडाचे मोठे नुकसान झाले असून, झाडाने पेट घेतला होता. घराच्या अगदी जवळ वीज पडल्याने घडशी कुटुंब थोडक्यात बचावले. पावसाचा परिणाम लांजा शहरासह रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि खाडी पट्ट्यात झाला होता..आता पडलेल्या गारांमुळे तयार होत असलेल्या फळांना ‘डाग’ पडण्याची शक्यता वाढली असून, काही ठिकाणी फळगळ झाली आहे. जो आंबा आता बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला होता, त्याला या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. यंदा राजापूर तालुक्यात आंबा उत्पादन चांगल्या प्रकारे आलेले आहे. अनेक बागायतदारांच्या पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्याला दरही चांगला मिळत आहे; परंतु गारपिटीमुळे बागायतदार हवालदिल झाले असून, मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे..दृष्टिक्षेपातबाधित आंबा बागांच्या पंचनाम्याचे आदेशशिवने गावात प्रथमच गारांचा पाऊसवीज पडून वीज उपकरणांचे नुकसान.वाटूळ परिसरामध्ये पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशा गारा पडल्या. आज प्रत्यक्ष डोळ्यांदेखत लिंबाच्या आकाराच्या गारा पडताना पाहणे हा रोमांचकारी अनुभव होता. निसर्गाचा हा खेळ विलोभनीय असला, तरी शेतीसाठी तो तितकाच घातक आहे.- प्रकाश वळंजू, वाटूळ, राजापूर.गारपिटीसह पावसाचा तडाखा चार तालुक्यांना बसला आहे. त्याचा परिणाम आंबा व काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करा, असे आदेश दिले आहेत.- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामध्ये झाडावरील आंबे खाली पडून नुकसान झाले आहे. त्याचवेळी या पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आंबा खराब होऊन त्यातून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.- राजेश जोशी, आंबा बागायतदार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.