Harnai Fishing Crisis: खवळलेल्या समुद्रामुळे मासळीचा दुष्काळ मच्छीमारांसाठी पॅकेजची मागणी; १५ ऑगस्टपासून हंगामात वारंवार व्यत्यय, मच्छीमार हैराण

Fishing Season Disrupted by Rough Sea Conditions: १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामात बदलत्या हवामानामुळे वारंवार मासेमारी बंद ठेवावी लागत आहे.
Harnai Fishing Crisis

Harnai Fishing Crisis

esakal

Updated on

दापोली: दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर मोठ्या अपेक्षेने १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या हर्णैतील मच्छीमारांसमोर आता दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे समुद्रात अपेक्षेप्रमाणे मासळी मिळत नसल्याने ‘मासळी दुष्काळा’ची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे धोकादायक ठरत आहे. परिणामी, हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांच्या आर्थिक गणितावर पाणी फिरले असून, शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करून मच्छीमारांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com