पाली - गौरी गणपती सणासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतात. सद्यस्थितीत या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यातच सर्वच चाकरमानी व गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
अवजड वाहतुकीमुळे तर कोंडीत अधिकच भर पडते. त्यामुळेच गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट देखील या काळामध्ये अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.