

Chavdar Tale Restoration Unveils 11 Wells, Rekindling Interest in Historic Site
esakal
महाड : पाण्याच्या निमित्ताने समतेचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्यावर संघर्ष झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठिकाणी सत्याग्रह करून समतेचा संदेश दिला. या तळ्याच्या जलशुद्धीकरणासाठी गाळ काढण्याचे काम सुरू झाले असून, तळ्यातील ११ विहिरींचा ठेवा पुन्हा दिसू लागला आहे. या ऐतिहासिक तळ्याचे अंतरंग पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करीत आहेत.