रायगड-रत्नागिरीत बुधवारी रेड अलर्ट; महामुंबईसाठी हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

monsoon
monsoon

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत आहे. येत्या बुधवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीचा होण्याची शक्यता असून दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत आज संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे 4 मिमी आणि सांताक्रुझ येथे 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उपनगरातील काही भागात आज दिवसभर पावसाचा शिडकावा होऊन अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मंगळवारीही महामुंबईत अशीच परीस्थिती राहणार असून बुधवारी काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासाठी नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळामुळे कोकणातील बागायती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात भात लावणीचे काम सुरु आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. 
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com