शेतकऱ्यांनो आंबा व काजू फळपिक विमा उतरवला का ? नोव्हेंबरपर्यंतच मुदत

the insurance of crop of fruit like mango deadline given to farmers on 30th november in ratnagiri
the insurance of crop of fruit like mango deadline given to farmers on 30th november in ratnagiri

रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे कोकणचा हापूस संवेदनशील बनत आहे. गतवर्षी विमा उतरवलेल्या शंभर बागायतदारांना परतावा मिळाला होता. यंदासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा आंबा व काजू या फळपिकासाठी लागू केली आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नैसगिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सुधारित
मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पत पुरवठ्यात सातत्य राखणे आणि उत्पादनातील जोखमीपासून संरक्षण ही विमा योजनेची उद्दिष्टे आहेत. यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड कंपनीची नियुक्‍ती केली आहे.

आंबा पिकासाठी अवेळी पाऊस झाल्यास १ डिसेंबर ते १५ मे कालावधीकरीता शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर ७ हजार रुपये हप्ता भरावयाचा असून १ लाख ४० हजाराचे विमा संरक्षण आहे. कमी तापमानासाठी १ जानेवारी ते १५ मार्च तर जास्त तापमानासाठी १ मार्च ते १५ मे कालावधी आहे. गारपिटीसाठी १ फेब्रुवारी ते ३१ मे या विमा संरक्षण कालावधीकरीता शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर २ हजार ३३३ रुपये हप्ता भरावयाचा आहे. त्यांना विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ रुपये आहे.  

काजूसाठी अवेळी पाऊस झाल्यास १ डिसेंबर ते १५ मे कालावधी असून कमी तापमानासाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या विमा संरक्षण कालावधीकरीता प्रति हेक्‍टर ५ हजार रुपये हप्ता भरावयाचा आहे. याकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये आहे. गारपिटीसाठी १ जानेवारी ते ३० एप्रिल विमा संरक्षण कालावधी असून शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर १ हजार ६६७ रुपये हप्ता भरावयाचा आहे. त्यांना विमा संरक्षित रक्कम ३३ हजार ३३३ रुपये आहे. गतवर्षी वाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीपोटी विमा संरक्षण देण्यात आले होते; मात्र यंदा तो निकष रद्‌द केला आहे.

सर्वांसाठी ऐच्छिक सहभाग

हवामान आधारित फळपिका विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी न होणे बाबत घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बॅंकेला देणे बंधनकारक आहे. गतवर्षी काही कर्ज बागायतदारांनी लाभ घेतला होता.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com