Ratnagiri Logistics : हापूस, काजू, मत्स्य निर्यातीला नवे बळ; स्थानिक तपासणी सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
FSSAI Lab : Food Safety and Standards Authority of India (FSSAI) लॅब आणि प्लांट क्वारंटाईन कार्यालयामुळे निर्यात लॉजिस्टिक खर्चात १० ते १५ टक्क्यांनी घट होणार आहे. यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे.
रत्नागिरी : जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफएसएसएआय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.