कणकवली : खचलेल्‍या पुलावर डांबरीकरणाचा थर

यंदाही दुरुस्ती रखडली; पूल खचण्याचा धोका
Road construction
Road constructionsakal
Updated on

कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरील शहरातील उड्डाणपूल जोडरस्ता सलग दोन वर्षे खचत आहे. त्‍यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता महामार्ग विभागाकडून डांबरीकरणाचा थर मारून दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहे. त्‍यामुळे उड्डाणपूल रस्त्याची दुरुस्ती यंदाही रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत महामार्ग अभियंत्यांशी संपर्क साधला असता दुरुस्तीबाबत वरिष्‍ठ पातळीवरून अजून कोणतेही निर्देश आले नसल्‍याची माहिती देण्यात आली.

महामार्ग चौपदरीकरणाचा दर्जा सुरुवातीपासूनच वादात राहिला आहे. उड्डाणपूल वाहतुकीला सुरू होण्यापूर्वीच उड्डाणपूलाची भिंत जुलै २०२० मध्ये दोन वेळा कोसळली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये उड्डाणपुलाचा भराव दोन्ही बाजूंनी एक ते दीड फुटाने खचला होता. त्‍यामुळे उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

यंदा पावसाळ्यापूर्वी खचलेल्‍या उड्डाणपूल रस्त्याचा भाग काढला जाणार होता. तेथे नव्याने बांधकाम होणार असल्‍याची ग्‍वाही महामार्ग विभागाने दिली होती; मात्र गेले दोन दिवस खचलेल्‍या मार्गिकेवर डांबरीकरणाचा थर करून रस्ता लेव्हल केला जात आहे. त्‍यामुळे यंदाही उड्डाणपुलाची दूरस्ती रखडली असून यंदाच्या पावसाळ्यातही उड्डाणपूलाची भिंत खचण्याचा धोका कायम राहिला

आहे.

शहरातील उड्डाणपुलाचे काम निकृष्‍ट दर्जाचे होत असल्‍याने सातत्‍याने आंदोलने झाली.

जुलै २०२० आणि ऑगस्ट २०२१ मध्ये उड्डाणपूलाची भिंत खचल्‍यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उड्डाणपुलावरील वाहतूक बंद पाडली होती. याखेरीज आम्‍ही कणकवलीकर संस्थेने या निकृष्‍ट कामाबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या सुनावणीत प्रांतधिकाऱ्यांची उड्डाणपूलाची खचलेल्‍या भिंतीचा भाग काढून तेथे नव्याने बांधकाम करण्याचे आदेश दिले होते; मात्र त्‍या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच या प्रकरणाची संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.

महामार्ग म्हणतो...

दरम्‍यान, उड्डाणपुलाच्या दुरुस्तीबाबत महामार्ग विभागाशी संपर्क साधला असता खचलेल्‍या उड्डाणपूल भागाच्या दुरुस्तीबाबत वरिष्‍ठ पातळीवर चर्चा सुरू असल्‍याची माहिती देण्यात आली.

सध्या पावसाळा जवळ आल्‍याने खचलेल्‍या महामार्गाच्या ठिकाणी क्राँक्रिट आणि डांबराचा थर मारून रस्ता समतल केला आहे; मात्र जो भाग धोकादायक आहे, त्‍या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच एकेरी मार्ग सुरू ठेवल्‍याचे स्पष्ट केले.

निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष

महामार्ग चौपदरीकरणाचे काम दर्जेदार होत आहे की नाही हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने एका कंपनीची नियुक्‍ती केली होती; मात्र महामार्ग अधिकाऱ्यांसह देखरेख करणाऱ्या या कंपनीकडूनही चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत सातत्‍याने दुर्लक्ष झाले आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना ३१ जुलै २०२० ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्लॅब कोसळला होता. तत्‍पूर्वी १३ जुलै २०२० ला उड्डाणपुलाची भिंत कोसळली होती. १६ जुलै २०२१ ला उड्डाणपुलावरील रस्ता दोन्ही बाजूंनी एक ते दीड फुटांनी खचल्‍याचा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com