

Climate Change imapact on Mango
sakal
कोकणातील आंब्याने देश-विदेशातील खवय्यांना भुरळ घालीत जागतिक दर्जा मिळविला. गेल्या काही वर्षांत आंबा हा कोकणच्या अर्थकारणाचा कणा बनला. मात्र, आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात बदलत्या वातावरणाचा तडाखा बसला. ९० टक्केपेक्षा अधिक मोहोराने बहरलेली झाडे पूर्णतः करपली. ही झाडे अक्षरक्षः काळवंडली असून दहा टक्केही उत्पादनाची हमी राहिलेली नाही. कुणी कर्ज तर कुणी हातउसने पैसे घेऊन लाखो रूपये बागांवर खर्च केले होते.