रत्नागिरी तालुक्यातील गोळप मुस्लिमवाडी परिसरातील आंबा बागेमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडामधील सूत्रधार ऊर्फ गोपाळ शतिराम विश्वकर्मा याला गुन्हा शाखेने शुक्रवारी अटक केली
न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दोन्ही मृत भावांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
गोळप येथील आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी खडकबहादूर बलराम थापा क्षेत्री व मक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री यांचा कोयत्याने वार करून आणि दगड छातीवर मारून खून करण्यात आला होता.
याबाबत मुसद्दीक मुराद मुकादम (रा. गोळप, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने घटनास्थळाची
पाहणी केली असता माहितगार व्यक्तीने हा खून केल्याची खात्री झाली. आजूबाजूच्या परिसरातील आंबा बागायतदार आणि त्यांच्याकडे राखणदारीसाठी असलेल्या नेपाळी गुरख्यांकडून चौकशी केली असता गोळप येथील आंबा बागेत राखण करणारा नेपाळी सरणकुमार ऊर्फ गोपाळ शतीराम विश्वकर्मा (वय ५८, स्य टिकापूर, नेपाळ) याने या दोघांना ठार मारल्याची माहिती पुढे आली.. त्याला ३ मे रोजी अटक करण्यात आली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.