Konkan railway passenger problems India
esakal
खेड (रत्नागिरी) : राज्यातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना, मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा धडाका (Konkan railway delays) लावला आहे. मात्र, कोकणातील प्रवाशांनी सातत्याने मागणी करूनही ‘दादर-रत्नागिरी’ गाडीचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासदारांचा आवाज दिल्लीत कमी पडत आहे का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.