

Konkan Expressways
esakal
चिपळूण: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कृषी व औद्योगिक पट्ट्याला कोकणातील जयगड आणि दिघी बंदरे जलदगतीने जोडण्यासाठी केंद्र सरकारने दोन महामार्ग प्रकल्पांची तयारी सुरू केली आहे. ‘जयगड–चिपळूण–सातारा’ आणि ‘दिघी-पोलादपूर-सुरूर’ या दोन प्रस्तावित द्रुतगती महामार्गांमुळे शेतमाल निर्यात, औद्योगिक उत्पादनांची वाहतूक तसेच कोकणातील बंदरांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.