Why are Olive Ridley turtles important?
esakal
रत्नागिरी : वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर १ हजार ७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद (Ratnagiri sea turtle nesting season update) झाली. त्यातून १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिलांना यशस्वीरीत्या समुद्रात सोडण्यात आले. उबवणीचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविले गेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांमधील ५४ हजार २२७ पिलांना समुद्रात सोडण्यात आले.