Adani Reliance nuclear investment in Maharashtra
esakal
रत्नागिरी : राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या सामंजस्य करारानुसार होऊ घातलेल्या एकूण चारपैकी तीन अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी, सिंधुदुर्गात साकारणार आहेत. यात बारसू (ता. राजापूर) येथे दीड लाख कोटी गुंतवणूक असलेला ६ हजार मेगावॉटचा, तर पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथे ७ हजार २०० मेगावॉटचा २ लाख कोटी गुंतवणूक असलेला प्रकल्प मंजूर (Ratnagiri Nuclear Project) झाला आहे.