Why is water leaking from Kasarde flyover?
esakal
तळेरे (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा येथील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर केलेल्या दुरुस्तीच्या कामावर (Mumbai Goa Highway bridge safety concerns) पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पुलाच्या पुढील स्लॅबमधून पाणी गळत असल्याचे निदर्शनास आल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य सहदेव ऊर्फ आण्णा खाडये यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.