

Uday Samant
esakal
रत्नागिरी: संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि विनाअडथळा होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. कशेडी घाटातील दरडीसह महामार्गावर पडणाऱ्या दरडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.