

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले पश्चिम बंगालमधील कामगार निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर बांधकामांची गती मंदावली आहे. कामगार नाही तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वेळेत कसा पूर्ण होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.