मुख्यमंत्री कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार; निलेश राणेंचे सरकारवर ताशेरे

मुख्यमंत्री कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार; निलेश राणेंचे सरकारवर ताशेरे

रत्नागिरी: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे फेल गेलं आहे. अश्या परिस्थितीमध्ये मागच्या निसर्ग चक्रीवादळासारख ह्या वादळात सुद्धा ठाकरे सरकार कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार असं दिसतंय. असा घणाघात ठाकरे सरकारवर निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे.

nilesh rane criticism on CM Uddhav Thackeray marathi Tauktae Vaccine news

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये रत्नागिरीत मंडणगड, राजापूर, दापोली, गुहागर या किनारपट्टीला वादळाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये देवगड किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 172 गावातील 1059 बागायतदार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, केळी या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई ठाकरे सरकार देणार की जनतेला वाऱ्यावर सोडणार असा प्रश्न राणेंशी उपस्थित केला आहे.

nilesh rane criticism on CM Uddhav Thackeray marathi Tauktae Vaccine news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com