
राजापूर( रत्नागिरी ) : अतिवृष्टी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटामुळे आर्थिक कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेड करणे वा कर्ज पुर्नगठण करणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करून दिलासा दिला. या योजनेचा प्राथमिक स्तरावर तालुक्यातील सुमारे एक हजार ५६७ कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न..?
अतिवृष्टीमुळे आलेली पूरस्थिती आणि त्यानंतर किडीचा प्रादुर्भावाने शेतीचे अतोनात नुकसान होवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. उत्पादनच कमी आल्याने शेती वा बागायतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेवून सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेच्या निकषानुसार तालुक्यातील सुमारे एक हजार ५६७ कर्जदार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.