

Konkan farmers
sakal
हवामानातील विपरीत बदलाने यावर्षी कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे अक्षरशः कंबरडे मोडले. आंबा-काजू पिकांचे ९० टक्के नुकसान झाल्यानंतर, ‘एकच गट्टी राजू शेट्टी’ अशा घोषणा देत, किमान उत्पादन खर्च भागेल इतकी तरी भरपाई मिळेल, या अपेक्षेने सिंधुदुर्गातील शेतकरी रस्त्यावर उतरले. मात्र, शासनाने विमा संरक्षित नसलेल्या क्षेत्राकरिता हेक्टरी २२ हजार रुपये म्हणजेच प्रतिझाड २२० रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आंबा-काजू बागायतदारांचा हिरमोड झाला आहे.