

Monsoon Hazard Analysis: Trapping Students in Muddy Pathways Post-Encroachment
Sakal
पाली : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सुधागड तालुक्यातील कौलोशी आदिवासीवाडीतील येथील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच येथील मुलांची पाऊलवाटही बंद होण्याच्या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.