सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनांनुसार ९ सप्टेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.
आजपासून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या सखल भागात जास्त करून मालवण व मुणगे परिसरात लाटांचा जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्रात सुमारे १.८ ते २.४ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तरी त्या अनुषंगाने किनारपट्टीच्या भागात विशेष दक्षता घेण्यात यावी.
किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने नौका किनाऱ्याजवळ न नांगरता सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, नांगरलेल्या बोटी एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात, या कालावधीत समुद्रात कोणत्याही जलक्रीडा प्रकार सुरू ठेवू नयेत. अनुचित घटना घडल्यास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.