म्हणुन... जिल्हा परिषदेच्या तब्बल ८८ शाळांचे वीज कनेक्शन कट....

The power connections of zp schools have been disconnected from mseb
The power connections of zp schools have been disconnected from mseb

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या ८८ शाळांची बिले थकीत राहिल्याने वीज जोडणी महावितरणकडून तोडण्यात आली आहेत. बिले भरण्यासाठी पुरेसा निधीच जमा न झाल्यामुळे ही वेळ आली आहे. ही बिले ग्रामपंचायतींनी स्वनिधी भरावीत, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींना स्व उत्पन्न नसल्यामुळे आधीच अडचणीत आहेत, त्यात शाळांची बिले भरण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी आधुनिक तंत्राचा उपयोग शिक्षणात करा, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पावणेतीन हजार शाळांपैकी बहुतांशी शाळा टेक्‍नोसेव्ही झाल्या आहेत. शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्‍टर लोकसहभागातून विकत घेण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी शाळांमध्ये विजेची गरज लागते. शासनाकडून बिले भरण्यासाठी वेगळी तरतूद केलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच्या शासन निर्णयानुसार वीज आकारणीत शिथिलता देण्यात आली आहे; परंतु पटसंख्या कमी असल्याने शासनाकडून शाळांना मिळणाऱ्या समग्र अभियानातील रक्‍कम अत्यल्प असते. हा निधी फक्‍त बिलासाठी नव्हे तर अन्य सुविधांवरही खर्च करावा लागतो. पंखा, ट्यूब, संगणक किंवा प्रोजेक्‍टरही शाळेत आहेत. त्यामुळे महिन्याची बिले वाढत आहेत. ती भरणे शक्‍य नसल्याने अनेक शाळांची अवस्था बिकट आहे. सहा ते सात महिने बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील ८८ शाळांची वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये विजेवर चालणारी सगळीच यंत्रणा बंद आहे. 

बिलांचा बोजा अडचणीचा ठरणार

या विषयावर दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद स्थायी समितीत चर्चा झाली. त्यामध्ये प्राथमिक शाळांची देयके ग्रामपंचायतीने स्वनिधीतून भरावीत, असा निर्णय झाला. त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून ग्रामपंचायत स्तरावर आवश्‍यक तरतूद बिल भरण्यासाठी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. तसे पत्र वीजजोडणी तोडलेल्या शाळांना ग्रामपंचायत विभागाकडून काढण्यात आले आहे; मात्र बिलांचा बोजा बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अडचणीचा ठरणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून बिले भरण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्र ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे.
-मनीषा देसाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com