Dark clouds over Raigad
sakal
कोकण
Raigad Rainfall : रब्बी हंगामालाही फटका हक्काच्या नाचणी वरी व कडधान्य या नगदी पिकांवर संकट
Climate Change : लांबलेल्या परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे अतोनात नुकसान तर झालेच आहे. आणि आता रब्बी हंगामाला देखील त्याचा फटका बसणार आहे. परिणामी येथील हक्काच्या नाचणी, वरी व कडधान्य या नगदी पिकांवर संकट ओढावले आहे.
पाली : रब्बी हंगामाची सुरुवात साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होते आणि तो मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत चालतो. जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साधारण बारा ते साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पिक घेतले जाते. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी राजा आपल्या शेतात कडधान्य लावतो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र लांबलेल्या पावसामुळे सध्या कडधान्य पिकास पूरक हवामान देखील नाही. आणि शेतजमीनीत पाणी साठले आहे.

