

Raigad heavy rain update 12 deaths hundreds of houses damaged thousands of poultry and livestock affected flood relief Maharashtra
पाली : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवितहानीसह खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी (ता. 25) दिलेल्या अहवालानुसार आत्तापर्यंत आपत्तीमुळे 12 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आणि 1 व्यक्ती बेपत्ता आहे. तसेच 46 मोठी जनावरे, 176 लहान जनावरे आणि 11436 कोंबड्या व पक्षी मृत अथवा बाधित झाले आहेत.