'विरोधकांनी नाकारले तरी 'चिपी'चे संपूर्ण श्रेय केंद्रीयमंत्र्यांनाच'

rajan teli
rajan teli
Summary

या सुविधा राज्‍य सरकारने करायच्या आहेत, त्‍या करण्यासाठी भाजपने विरोध केलाय का?

कणकवली : चिपी विमानतळ उद्‍घाटनाचे श्रेय अवश्‍य घ्या. पण रस्ता, पाणी, वीज या पायाभूत सुविधा कधी पूर्ण करणार असा सवाल भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. 'मोपा' विमानतळ कार्यान्वित होण्यापूर्वी या सुविधा न झाल्‍यास, चिपी विमानतळाला भवितव्यच राहणार नाही असेही ते म्‍हणाले. येथील भाजप कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्‍हणाले, येत्‍या ९ ऑक्‍टोबरला चिपी विमानतळाचे उद्‍घाटन होत आहे. यात सिंधुदुर्गवासीयांचे गेल्‍या अनेक वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र या विमानतळाला जोडणाऱ्या दुपदरी रस्त्याला अजूनही मंजूरी मिळालेली नाही. पाणी पुरवठा योजनेचे अजूनही ८ किलोमिटरचे काम शिल्‍लक आहे. तर ३३ केव्हीच्या वीज वाहिन्यांचे कामही अजून सुरू झालेले नाही.

rajan teli
"भारताशिवाय दहशतवाद, तापमानवाढ, लोकसंख्यावाढ यांवर तोडगा अशक्य"

पुढे तेली म्‍हणाले, यापूर्वीची पाच वर्षे दीपक केसरकर पालकमंत्री होते. आता शिवसेनेचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. पण वीज, रस्ता, पाणी या सुविधा ते निर्माण करू शकले नाहीत. या सुविधा राज्‍य सरकारने करायच्या आहेत, त्‍या करण्यासाठी भाजपने विरोध केलाय का? त्‍यामुळे विमानतळाचे श्रेय घेण्याबरोबरच या पायाभूत सुविधांचीही निमिर्ती करा अन्यथा, चिपी विमानतळाला भवितव्य राहणार नाही.

तेली म्‍हणाले, आमच्या विरोधकांनी कितीही नाकारले तरी चिपी विमानतळाचे संपूर्ण श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनाच द्यावे लागेल. आमचा कुठल्‍याच विकासकामाला विरोध नाही. पण पायाभूत सुविधा अपूर्ण ठेवून तुम्‍ही श्रेयवादाच्या गोष्‍टी करू नयेत. खासदार विनायक राऊत यांची ही दुसरी टर्म आहे. आमदार केसरकरांची तिसरी टर्म आहे. कुडाळ-मालवणचे आमदारही शिवसेनेचे आहेत. त्‍यामुळे पायाभूत सुविधांची कामे पूर्ण व्हायलाच हवीत. ती आधी पूर्ण करा नंतरच विमानतळाचे श्रेय घ्या.

rajan teli
भारत बंद यशस्वी, शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा - राकेश टिकैत

कर्ली खाडीत जेटी उभारणी झाली तरच विमानतळ चालेल

चिपीचा विमानतळ बारमाही सुरू राहायचा असेल तर उत्तर गोव्यातील पर्यटक तसेच प्रवाशांनाही आकर्षित करावे लागेल. विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या कर्ली नदीत जेटी उभारली. तेथून गोव्यापर्यंत स्पीड बोटची व्यवस्था केली, तर मोठ्या संख्येने पर्यटक आणि गोव्यातील प्रवासी या विमानतळाचा वापर करतील आणि विमानतळावर फेऱ्याही वाढतील. त्‍यामुळे राज्‍य सरकारने जेटीचा विचार करावा. केंद्राकडून आम्‍ही सहकार्य देऊ अशी ग्‍वाही तेली यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com