Why are cyclone shelters being built in Rajapur?
esakal
राजापूर : राजापूर तालुक्याच्या सागरी किनारपट्टी भागासह अन्य भागांमध्ये सातत्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या घटना पावसाळ्यामध्ये यापूर्वी सातत्याने घडल्या (Rajapur Cyclone Shelter) आहेत. त्यामुळे शासनाच्या आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत कोदवली, पाचल, जैतापूर, साखरीनाटे येथील चक्रीवादळ निवारा केंद्रांची उभारणी केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीकाळात सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेला बळकटी देणे अन् आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या अधिक सक्षमतेच्यादृष्टीने हे बहुद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.