Shivkalin Rasalgad Fort Maharashtra
esakal
खेड (जि. रत्नागिरी) : धुक्याची शुभ्र चादर... हिरव्यागार सह्याद्रीने पांघरलेला निसर्ग... डोंगरदऱ्यांतून वाहणारा थंड वारा आणि इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला रसाळगड ! रघुवीर घाट पावसाळ्यात दरडींच्या धोक्यामुळे पर्यटकांसाठी बंद झाल्यानंतर खेड तालुक्यातील हा शिवकालीन दुर्ग आता पर्यटकांना फिरण्यासाठी नवे ठिकाण बनला आहे. दर शनिवार-रविवारी इतिहासप्रेमी, दुर्गभ्रमंती करणारे युवक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी रसाळगडावर दाखल होत आहेत.