
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेडमधील जगबुडी नदीत कार कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होते अशी माहिती आहे. अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.