

Ratnagiri Hapus Mango
esakal
रत्नागिरी: हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. गणपतीपुळे, पावस परिसरात या कातळ भागातील हापूस आंबा कलमांना वेळेआधीच मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा माॅन्सून कालावधी अनियमिततेच्या गर्तेत अडकलेला आहे. जून महिन्यातच कोरड्या दिवसांचा कालावधी अधिक होता. ऑगस्ट महिन्यातही अनेकवेळा उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. सलग दोन ते तीन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर अचानक पडलेले कडक ऊन याचा परिणाम हापूस आंबा कलमांवर झालेला आहे.