water supply schemeesakal
कोकण
Water Scheme : ३७ पाणी योजना रत्नागिरीत ५० टक्के पूर्ण : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण; १३५.७२ कोटी खर्च
Ratnagiri News : येत्या वर्षभरात योजनेचे काम पूर्ण होणार आहे. पुढील २६ वर्षांतील सुमारे २ लाख लोकांचा विचार करून योजना तयार केली आहे. त्यामुळे गावांची तहान भागणार असून, एमआयडीसीवरील पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ३७ गावांतील २०४ वाड्यांची तहान भागवणाऱ्या मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. पुढील २६ वर्षांतील सुमारे २ लाख लोकांचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

