

Ratnagiri Jan Suvidha
esakal
रत्नागिरी: ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘जनसुविधा’ आणि ‘नागरी सुविधा’ योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे. जनसुविधा योजनेतील ९०९ कामे पूर्ण झाली असून, नागरी सुविधा योजनेतील ९४ कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मान्यता, निविदा आणि वर्कऑर्डरची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असल्याने विकासकामांना चालना मिळाली आहे.