Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
esakal
लांजा (रत्नागिरी) : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे लांजा तालुक्यातील प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ माचाळ येथील ‘भिषाचा कडा’ म्हणजेच ‘उलटा धबधबा’ या ठिकाणी सुरक्षित कठडा नसल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण झाला (Bhishacha Kada tourist safety Ratnagiri) आहे. सध्या पावसाळ्यात येथे येणारा पर्यटक वर्ग वाढला असल्यामुळे या ठिकाणी तत्काळ लोखंडी संरक्षक कठडा (सुरक्षा भिंत) उभारण्यात यावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे (ग्रामीण) अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.