why mango production is decreasing in ratnagiri
esakal
रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी विभागाने १७ मार्च २०२६ ला सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली (Ratnagiri Mango Production Drop 2026) आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याचा संयुक्त पाहणी दौरा केला, त्यातून ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.