रत्नागिरी : शहरातील महात्मा गांधी रोड येथे विकासकाकडून व्यापारी संकुल उभारले जात आहे. मात्र हे व्यापारी संकुल उभे करताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप भाजप गटनेते समीर तिवरेकर आणि नगरसेवक राजेश तोडणकर यांनी केला. रोड वायडिंगच्या जागेतच महावितरणचा रोहित्र उभारून संकुलाच्या पायऱ्या केल्या जात असल्याचे सभागृहापुढे मांडले.
नगरसेवकांच्या तक्रारीवरून नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी तत्काळ तो रोहित्र रस्त्यातून हटविण्याचे आदेश विकासकाला द्यावेत, असे पालिकेच्या बांधकाम विभागाला आदेश दिले. पालिकेच्या आजच्या विशेष सभेत भाजप गटनेते समीर तिवरेकर आणि नगरसेवक राजेश तोडणकर यांनी विकासकाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. विठ्ठल मंदिराशेजारी व्यापारी संकुल उभे राहत आहे.
नियमानुसार दीड मीटरचे रोड वायडिंग आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात कमी रुंदीचा रस्ता होत आहे. याच रोड वायडिंगमध्ये विकासकाकडून रोहित्र आणि संकुलाच्या पायऱ्या बांधला जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. या मार्गावरून एकादशीच्या यात्रा, विविध उत्सव, विसर्जन मिरवणूका जातात. रस्ता कमी केल्यास आणि रस्त्यात रोहित्र बसवल्यास भविष्यात दुर्घटना घडण्याची भीती आहे.
याबाबत विचारणा केली असता विकासकाने उडवाउडवीची उत्तरे देत खोटी तक्रार दाखल केली आहे. रोड वायडिंगमधील रोहित्र आणि पायऱ्या तत्काळ हटवा, अशी मागणी भाजप गटनेते तिवरेकर यांनी सभागृहात केली. तक्रारीवरून नगराध्यक्ष साळवी यांनी प्रत्येक विकासकाने नियमानुसारच काम केले पाहिजे.
नियमानुसार बांधकाम होत आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी पालिकेच्या बांधकाम खात्याची आहे. रस्त्यात रोहित्र बसवून भविष्यात दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार पालिका राहील. यामुळे रस्त्यातील रोहित्र आणि पायऱ्या संबंधित विकासकाला हटविण्याचे आदेश तत्काळ द्या, अशा सूचना नगराध्यक्षांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.