Ratnagiri SP Nitin Bagate meets farmers in field
esakal
रत्नागिरी : तळागाळातील जनतेच्या भावना जाणून घेणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन विश्वासाचे नाते जपणे म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘सोशल पोलिसिंग’. याचेच एक बोलके उदाहरण रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले (Ratnagiri police joins farmers in rice plantation) आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे चिखलात उतरून, हातात नांगर धरत त्यांनी प्रत्यक्ष शेतकरी बांधवांसोबत भात लावणीचा आनंद घेतला.