कोकण रेल्वेचे तिकीट महागच: थाळ्या वाजवा म्हणणारे गप्प का? राऊळ

शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ
शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळsakal

सावंतवाडी : केंद्र व राज्य सरकारने कोविड नियमावलीत अनलॉक करूनही कोकण रेल्वेने (Konkan Railway)मात्र अनलॉक केला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना वाढीव दराचे तिकीट घ्यावे लागत आहे. सवलीतीही बंद आहेत. थाळ्या वाजवा, ढोल वाजवा म्हणणारे आता गप्प कशासाठी असा प्रश्‍न शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ (Rupesh Raval) यांनी उपस्थित करत केंद्र सरकार विरोधात वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनामुळे जग थांबले होते. त्यामुळे सर्व व्यवहारही ठप्प झाले होते. आता केंद्र व राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार अनलॉक जाहीर होत आहे; मात्र या अनलॉकमधून कोकण रेल्वे पूर्वपदावर आलेली नाही. प्रचंड महागाईमुळे लोक हैराण झाले असतानाच कोकण रेल्वेचे प्रवास भाडे मात्र जादा आहे. कोकण रेल्वेने स्पेशल गाड्या सोडल्या. या गाड्यांच्या तिकिटाचा दर देखील महागडाच राहिला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सुविधा असणाऱ्या सर्व नागरिकांना महागड्या तिकीटाचे आरक्षण करावे लागले त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड पडला आणि कोकण रेल्वेला मात्र त्याचा आर्थिक फायदा झाला असे रुपेश राऊळ यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या आशिर्वादाने पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईमुळे लोक आर्थिकदृष्टया होरपळून जात आहेत. कोकण रेल्वे देखील महागडे तिकीट आकारून प्रवाशांची, जेष्ठ नागरिकांची एकप्रकारे लूट करीत आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावा, अशी मागणी आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ
भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचे टिकास्त्र

ज्येष्ठ नागरिकांना सवलत दराने तिकीट मिळत होते तेही कोविड काळात बंद झाले आहे. आता तर केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र अनलॉक सुरू केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने रेगुलर गाड्या सोडून तिकीट दर पूर्ववत करावा, अशी मागणी आहे, असे राऊळ यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांची तिकीटाच्या माध्यमातून लूट होत असताना त्याकडे ढोल वाजवा म्हणणाऱ्यांचे लक्ष गेले नाही, असा टोला देखील त्यांनी हाणला. रेल्वे तिकीटामधुन लाखो रुपयांची लूट थांबविण्यासाठी कोकण रेल्वे पूर्वपदावर आणून रेगुलर गाड्या सोडाव्यात आणि तिकीट दर देखील पूर्ववत करावा, अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत, ती मान्य केली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असे राऊळ यांनी सांगितले. कोकण रेल्वे पूर्वपदावर यावी, सर्व गाड्या सोडाव्यात आणि स्पेशल तिकीट दर रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com