ऐन हंगामात मासळीवर संक्रात; हर्णे बंदरातील नौकांना खाड्यांचा आधार

राज्यसरकार आम्हा मच्छीमारांकडे लक्ष देणार की नाही; धनाजी पावसे
Harne Port
Harne Portsakal

हर्णे : पाकिस्तानमधील वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रावर धडकल्याने अरबीसमुद्रामध्ये वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहत असल्याने हर्णे बंदरातील नौकांनी मिळेल त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा वातावरणामुळे मासळी उद्योगावर ऐन हंगामात संक्रात आल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे.

Harne Port
'मला आठवत नाही', चांदीवाल आयोगाच्या उलट तपासणीत देशमुखांनी प्रश्न टाळला?

सध्या हर्णे बंदरात मलपी येथील फास्टर नौकांमुळे मासळी दुष्काळ आला होता. त्यात या वादळांन तोंड फोडलं आहे. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. गेले दोन दिवसांत तुरळक पाऊस देखील पडला. तसेच या वादळामुळे गेले दोन दिवस उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत. अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या नौकांची तारांबळच उडाली. मिळेल त्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी पलायन केले. २०० नौकानी रत्नागिरी बंदरात, साधारण ४०० नौकांनी हर्णे बंदरात तर जयगड खाडीत १०० ते १५० नौका तर किमान १०० नौकांनी आंजर्ले खाडीत आसरा घेतला आहे. अजूनही पुढील दोन दिवस असच शांत रहावं लागणार आहे. जोपर्यंत हे वादळी वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आम्ही मासेमारीकरिता जाऊ शकत नाही ; असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

Harne Port
मग बाळासाहेबांनी शिवसेना सडवली का?, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

सध्या हर्णे बंदरात खूपच मासळी उद्योगाची कठीण परिस्थिती होऊन बसली आहे. कारण केरळ मलपी येथील याच भागात थव्याने येऊन नियमांचं उल्लंघन करून मासेमारी करून जातात. त्यामुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी गेल्यावर पाहिजे ती मासळीच मिळत नाही. कधी कधी मिळेल त्याला मिळत नाही त्याला काहीच मिळत नाही. ज्या मासळीला दरच नाही ती मासळी मिळते परंतु सध्या खूपच दुष्काळ पडला आहे. त्यात या अशा बिघडलेल्या वातावरणामुळे तोंडचं फुटते. हे असंच चालू राहील तर उद्योग लवकरच आटपता घेणार असल्याचे देखील येथील मच्छीमारांनी सांगितले.आम्हा मच्छीमारांना कोणीही नेता नाही की कोणीही वालीदेखील नाही. अशी ही आस्मानी संकट आली की आम्ही आमच होणार नुकसान उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. आमची होणारी फरफट कुठल्याच सरकारला दिसत नाही का? शिवाय फास्टर नौकांची अवैध मासेमारी आम्हाला रोजच मारत आहे. राज्यसरकार आम्हा मच्छीमारांकडे लक्ष देणार की नाही; अशी संतप्त प्रतिक्रिया हर्णे बंदरातील मच्छीमार श्री. धनाजी पावसे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com