सिंधुदुर्ग : केंद्राचे धोरण सामान्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे

राऊत : चुकीच्या निर्णयांमुळेच इंधन दरवाढ
राऊत : चुकीच्या निर्णयांमुळेच इंधन दरवाढ
राऊत : चुकीच्या निर्णयांमुळेच इंधन दरवाढSakal

वैभववाडी : पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य जनतेला उद्‍ध्वस्त करणे, हेच एकमेव धोरण केंद्राचे आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. कोळपे-जमातवाडीतील ५० हून अधिक आणि कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील ६० हून अधिक विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, नीलम पालव, सुशांत नाईक, नंदू शिंदे, मंगेश लोके, गीतेश कडू, इसार शेख, गौस पाटणकर, जावेद पाटणकर, प्रदीप रावराणे उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ‘‘केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल लवकरच १२५ रुपयांचा टप्पा पार करेल. गॅस सिलिंडर एक हजार रुपयांवर पोचले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून सामान्यांना जगणे महाग झाले आहे. सामान्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे केंद्राचे धोरण आहे. महाराष्ट्राला वैचारिक परंपरा आहे. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले; परंतु देवेंद्र फडणवीसांइतका खुर्चीचा हव्यास कुणीही केला नाही. सुरुवातीला येणार येणार म्हणून सांगितले ते आलेच नाहीत; परंतु गेल्यानंतर देखील गेलो तरी आहे, असे सांगत आहेत.’’

राऊत : चुकीच्या निर्णयांमुळेच इंधन दरवाढ
अलिबाग : सावित्री पात्रातील गाळ काढणार- अजित पवार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘पदासाठी अनेक पक्ष राणेंनी बदलले. राणेंनी सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती; परंतु त्यांच्यावर कधी कारवाई झाली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर तुरुंगात जावे लागते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. मोदींवर राणेंइतकी टीका कुणीच केलेली नाही. तरीदेखील राणे सध्या भाजपमध्ये आहेत. नैतिकता हा प्रकार त्यांच्याकडे नाहीच. कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते आहे. कोकणात शिवसेनेचा झंझावात २०१४ पासून सुरूच आहे. आजच्या प्रवेशाने हेच सिद्ध होत आहे. प्रवेश करणाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत विकास प्रक्रियेत सामावून घेऊ.’’

सावंत म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने कोरोना कालावधीतही विकास कामांना निधी कमी पडू दिला नाही; परंतु येथील आमदार सातत्याने राज्य सरकारवर टीका करीत आहेत. तेच आमदार राज्य सरकारने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम मात्र न चुकता करीत आहेत. कोणत्याही कामाचा पाठपुरावा करायचा नाही. त्यांना विकासाशी काहीही देणंघेणं नाही. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन दिसून येत आहे. आजचा प्रवेश परिवर्तनाची नांदी आहे.’’

रावराणे म्हणाले, ‘‘शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ती एक सामाजिक संघटना आहे. विकास हाच आमचा मूलमंत्र आहे. जात, पात, धर्म यामध्ये न अडकता माणुसकीने काम करणे, हेच शिवसेनेचे कार्यकर्ते करतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com