Ratnagiri Landslide: १६ वर्षानंतरही भय इथले संपत नाही! प्रशासन बधिर; शिवणेबुद्रूक पुन्हा धोक्याच्या छायेत, संरक्षण भिंती कोसळल्या, भेगा वाढल्या..

Maharashtra village faces renewed threat after 16 years: शिवणेबुद्रुक-वडवली-ओणी रस्ता पुन्हा खचण्याच्या उंबरठ्यावर; संरक्षण भिंती कोसळल्या, भेगा वाढतच, १६ वर्षांनंतरही कायम भीतीचे सावट
Sixteen Years Later, Shivnebudruk Residents Still Live Under Shadow of Danger

Sixteen Years Later, Shivnebudruk Residents Still Live Under Shadow of Danger

esakal

Updated on

-राजेंद्र बाईत राजापूर

राजापूर: फयान वादळात झालेल्या अतिवृष्टीत सुमारे २५ फूट खोल खचलेला शिवणेबुद्रुक-वडदहसोळ येथील रस्ता गतवर्षी पुन्हा खचला. पूर्वी ज्या ठिकाणी जमिनीसह रस्त्याला भेगा पडल्या होत्या, त्या आजही तशाच आहेत. या परिसरातील संभाव्य भूस्खलन रोखण्यासाठीच्या उपाययोजनाही कुचकामी ठरत आहेत. वर्षभरात केवळ डागडूजीव्यतिरीक्त ठोस कार्यवाही झालेली नाही. उपाययोजनांचे प्रस्ताव धूळ खात आहेत. यावर्षीही शिवणेबुद्रुक-वडदहसोळ परीसरातील रस्ता पावसाळ्यात खचण्याची शक्यता आहे. प्रशासकीय अनास्था पाहता सोळा वर्षानंतरही ‘भय इथले संपत नाही......’ अशीच स्थिती शिवणेबुद्रुक-वडदहसोळमध्ये आहे. -

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com