शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी दीड लाखाचे अनुदान

शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी दीड लाखाचे अनुदान

शेततळ्यासाठी दीड लाखाचे अनुदान

राजापूर, ता. ३ ः राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते. परिणामी त्यांना शेती व्यवसायातून चांगली कमाई करता येत आहे. यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार असून तरुण शेतकऱ्यांना यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
विहिर आणि शेततळ्यासाठी अनुदान मिळते. शेततळे खोदण्यासाठी कमाल ५ हजार रुपये आणि अस्तरीकरणासाठी कमाल ७५ हजार असे एकूण दीड लाख रुपये अनुदान दिले जाते. शेततळयासाठी दिले जाणारे हे अनुदान शेततळ्याच्या आकारमानानुसार मिळत असते.
वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्ज करताना २३ रुपये ६० पैसे एवढे शुल्क भरावे लागत आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकना अर्ज करता येतो. एकाच वेळी त्यांना जेवढ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी अर्ज करू शकतात. जोपर्यंत लॉटरी पद्धतीने सदर योजनेसाठी निवड होत नाही तोपर्यंत एकदा केलेला अर्ज ग्राहय धरला जातो. म्हणजेच शेतकऱ्याला प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही आणि वारंवार अर्ज करावा लागत नाही. दरमहा प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com