उन्हाळी हंगामात मुंबई, पुण्यासह (Mumbai Pune) परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात.
चिपळूण : उन्हाळी हंगामात मुंबई, पुण्यासह (Mumbai Pune) परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेमार्गावर ३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत गाड्या धावणार आहेत.