

Historical Decision for Tribal Welfare: Separate '7-E' Satbara
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील इनामी जमिनींवरील कुळ, वनहक्क (FAR) पट्टेधारक आणि महाराष्ट्र शासनाच्या वनजमिनी कसणाऱ्या शेतकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांची नोंद ७/१२ उताऱ्यावर व्हावी, यासाठी भाजप किसान मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित सदाशिव बारसकर यांनी लावलेला तगादा आणि केलेल्या आक्रमक पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळेच तालुक्यातील शेतकाऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वारस नोंदींचा गंभीर प्रश्न मार्गी लागला आहे.