

Students and commuters are being forced to take longer alternate routes, leading to increased travel time and expenses.
Sakal
पाली : रायगड आणि पुणे या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ताम्हिणी घाट मार्ग ओळखला जातो. मात्र, मुसळधार पावसात काही ठिकाणी दरड कोसळून व रस्ता खचल्याने मागील अनेक दिवसांपासून हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक, प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.