भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत

भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत

Published on

भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत
आमदार भास्कर जाधव ; नाणार, बारसू प्रकल्प होणारच नाहीत
चिपळूण, ता. २१ः भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत. त्यामुळे नाणार आणि बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत. भाजपचे केंद्रात सरकार आहे. त्यांना हे प्रकल्प करणे केव्हाही सहजशक्य आहे; मात्र विरोधाचे थातूरमातूर कारण देऊन भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केला.
दापोली तालुका भगवा सप्ताहानिमित्त ते दापोलीत बोलत होते. ते म्हणाले, लाखो तरुणांच्या रोजगाराचा घास पळवण्याचे काम सरकारने केले. अखंड देश, महाराष्ट्र जेव्हा कोविडशी लढत होता तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त राजकारण करत होते. ते म्हणाले, लाखो कोटींचे प्रकल्प बाहेर पाठवायचे आणि ३०० कोटींचा प्रकल्प आणायचे एवढेच काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना गुजरात सोडून इतर ठिकाणी मोठा प्रकल्प द्यायचे नाहीत, असे सांगितले. त्यांना महाराष्ट्राला प्रकल्प द्यायचे नाहीत एवढं त्यांचे हृदय मोठे नाही, असा आरोपही जाधव यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com