खेड-खेडमध्ये पाणीटंचाई संकट गडद

खेड-खेडमध्ये पाणीटंचाई संकट गडद

खेडमध्ये पाणीटंचाई संकट गडद
२३ गावे तहानलेली ; प्रशासनाची कसरत
खेड, ता‌. ३० ः तालुक्यात उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत तळ गाठत असल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद बनत चालले आहे. सद्यःस्थितीत २३ गावे ५८ वाड्या तहानलेल्या असून, तब्बल ७ हजार ९६८ ग्रामस्थ तहानलेले आहेत. सर्वाधिक ग्रामस्थांची संख्या कोंडिवली येथील असून ६ वाड्यांतील १०४० ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. एक शासकीय व तीन खासगी टँकरद्वारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करताना प्रशासन अक्षरश: जेरीसच आले आहे.
तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांना अर्धशतक ओलांडत टंचाई आराखड्यात विक्रम प्रस्थापित केलेला असतानाच तहानलेल्या ग्रामस्थांच्या वाढत्या आकडेवारीनेही नवा विक्रम नोंदला गेला आहे. प्रशासनाकडून तहानलेल्या गाव-वाड्यांना एक शासकीय व तीन खासगी टँकरद्वारे २३ गावे ५८ वाड्यांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेमतेम पाण्यावर तहान भागवायची कशी, असा यक्षप्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com