सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाताहात

सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाताहात

१९ ( पान ३ साठी )


rat१४p२१.jpg-
२३M०९३७३
रत्नागिरी - मुख्य बाजारपेठेतील पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह बंद आहे.

rat१४p२२.jpg-
२३M०९३७४
शहरातील अस्वच्छ स्वच्छतागृह.
---------


रत्नागिरीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाताहात

स्वच्छता मोहिमेकडे पाठ ; काहींना लागलेय टाळे

रत्नागिरी, ता. १४ ः पालिकेच्या शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरती वाताहात झाली आहे. ''सकाळ''च्या वाचकांनीच या अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांची भांडाफोड केली आहे. काही स्वच्छतागृह तर बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र पालिकेने याबाबत हात वर केले असून स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची ३८ सार्वजनिक स्वच्छतागृहे सुस्थितीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे थेट नागरिकांशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
पालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये सार्जजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता हा महत्वाचा भाग आहे. आता नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत दीड कोटीचा पुरस्कार पालिकेला मिळाला आहे. स्वच्छतेच्या जोरावरच हे पुरस्कार पलिकाने पटकावले आहेत; मात्र पुरस्कार संपल्यानंतर या स्वच्छता मोहिमेकडे पालिकेने पाठ केली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पालिकेची शहरामध्ये सुमारे ३८ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. यामध्ये सुमारे २४२ सीट आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या १४ कर्मचाऱ्यांकडून या स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात असल्याचा दावा पालिकेने केले आहे; परंतु पालिकेचा हा दावा काही स्थानिक नागरिकांनी आणि ''सकाळ''च्या वाचकांनी खोडून काढला आहे. शहरातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी स्वच्छतागृहे सोडली तर बहुतांशी स्वच्छतागृहांची अक्षरशः वाताहत झाली आहे.
स्वच्छतेचे प्रतीक म्हणून पालिकेने अनेक स्वच्छतागृहे उभारली आहेत; परंतु या स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता होत नसल्याने स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या सर्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारती शोभेच्या बाहु्ल्या असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहेत. काही ठेकेदार पद्धतीवर चालवायला दिली असली तरी त्यांचीही अपेक्षित स्वच्छता होत नाही. मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतागृहाला तर टाळेच ठोकले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील स्वच्छतागृहाची ही दशा झाली आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून ती वेळेवर स्वच्छ करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com